Category: शहर

मंगल नगर मार्केटमध्ये वसुलीचा ‘बाजार’; गरिबांच्या खिशातून ठेकेदाराचे खिसे गरम!

​मिरा-भाईंदर:– घनश्याम आंबोकर मिरा-भाईंदर महापालिकेच्या कारभारावर आता ‘बाजार वसुली’वरून गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मंगल नगर येथील भाजी मार्केटमध्ये गरीब विक्रेत्यांकडून दररोज तब्बल २३० रुपयांची वसुली केली जात असल्याचा धक्कादायक…

​’नरेंद्र, कब मिलेगा सिलेंडर?’; मिरा-भाईंदरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जोरदार आंदोलन

घनश्याम आंबोकर , मिरा रोड: ​देशात आणि राज्यात घरगुती गॅस सिलेंडरचा भासणारा तुटवडा आणि विस्कळीत झालेल्या वितरण व्यवस्थेच्या निषेधार्थ मिरा-भाईंदरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आक्रमक निदर्शने करण्यात आली. ‘नरेंद्र कब…

​मिरा-भाईंदरकरांचे मेट्रोचे स्वप्न साकार! दहिसर-काशीगाव पहिल्या टप्प्याचे थाटात लोकार्पण

घनश्याम आंबोकर , मिरा-भाईंदर: मिरा-भाईंदरकरांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मेट्रो-९ च्या पहिल्या टप्प्याचे (दहिसर ते काशीगाव) लोकार्पण आज दुपारी १ वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.…

​डॉ. कलाम-रामनाथ शास्त्री यांच्या मैत्रीचा आदर्श जपा; मुंबईत सलोख्याचा जागर

घनश्याम आंबोकर , मुंबई ​”देशाच्या जडणघडणीत धार्मिक भिंतींपेक्षा मानवी नात्यांचे बंध अधिक महत्त्वाचे आहेत. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि रामनाथ शास्त्री यांच्यातील बालपणीची घट्ट मैत्री हा केवळ इतिहास…

मुंबईत ‘अखिल भारतीय डॉ. आंबेडकरी साहित्य संमेलन २०२६’चा बिगुल; वडाळा येथे वैचारिक मंथन रंगणार

​मुंबई | ४ एप्रिल २०२६ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीकारी विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि आंबेडकरी साहित्यातील विद्रोही व प्रज्ञावादी परंपरेचा जागर करण्यासाठी मुंबईत ‘अखिल भारतीय डॉ. आंबेडकरी साहित्य…

वृत्त निवेदिका रिया पवार यांना ‘नारीशक्ती सन्मान’ प्रदान

​पुरोगामी विचारांची पाठराखण केल्याबद्दल गौरव; ‘माणूसकी फाऊंडेशन’चा उपक्रम ​मुंबई: आपल्या परखड पत्रकारितेतून आणि वृत्त निवेदनातून सामाजिक विषयांना वाचा फोडणाऱ्या ज्येष्ठ वृत्त निवेदिका, पत्रकार आणि साहित्यिक रिया पवार यांना ‘नारीशक्ती सन्मान’…

कामगारांच्या लढ्यासाठी वज्रमुठ बांधा; ‘युवाशक्ती’च्या व्यासपीठावरून रुबीना मुल्ला यांचे थेट आवाहन

​वसई: “भविष्यात कामगार वर्गासमोर उभी ठाकणारी आव्हाने आणि प्रशासकीय अनास्थेमुळे भरडला जाणारा सामान्य नागरिक, या सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी आता विखुरलेले संघटन एकवटणे काळाची गरज आहे. सरकारने कामगार धोरणांबाबत घेतलेले…

नारीशक्तीचा जागर! विरारमध्ये ‘माणूसकी फाऊंडेशन’तर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

विरार: प्रतिनिधी‘स्त्री’ म्हणजे केवळ चूल आणि मूल नाही, तर ती समाजाच्या प्रगतीचा कणा आहे. हाच पुरोगामी विचार जपत विरारमध्ये माणूसकी फाऊंडेशनच्या वतीने ‘नारीशक्ती सन्मान पुरस्कार’ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.…

वसई-विरार पालिकेचा ‘वापर आणि फेकून द्या’चा डाव?कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संयमाचा अंत; विशेष महासभेकडे लक्ष

वृत्तसेवा, विरार :कोविडच्या काळजी काळोखात जिवाची पर्वा न करता शहराला सावरणारे कंत्राटी डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचारी आज स्वतःच्या हक्कासाठी महापालिकेच्या दारात उभे आहेत. ‘समान काम, समान वेतन’ या तत्त्वाची पायमल्ली…

वसई-विरार पालिकेच्या घनकचरा विभागात ‘वशिलेबाजी’चा कचरा?

आरोग्य निरीक्षकांच्या नियुक्तीत दुजाभाव; एकाच महिला अधिकाऱ्यावर मुख्यालयाची मेहेरनजर ​ प्रतिनिधी, वसई वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील कार्यपद्धती आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आरोग्य निरीक्षकांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रीय (Field) पदावर…